नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी सीमावादाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातला ठराव विधीमंडळात एकमतानं मंजूर झाला. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा विधानसभेत निर्धार करण्यात आला. तसेच यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या भाषेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
विधानभवनावर ‘आप’चा धडक महामोर्चा, विविध मागण्यांसाठी दिले निवेदन
यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाच्या रेट्यापुढे सत्ताधारी पक्ष झुकला. कर्नाटक सीमावादावर विधानभवनात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. सीमाभागातील बांधवांच्या हक्काचे संरक्षण करणे तसेच बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीच्या इंचनइंच जागेवर महाराष्ट्राचा हक्क असल्याचा ठराव सदनात सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
“तरूणाला शिव्या देत जबरदस्त मारहाण, शिंदे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत”
सीमाप्रश्नी विधीमंडळात मराठीतून ठराव मांडण्यात आला. याआधी या ठरावामध्ये अनेक व्याकरणाच्या चुका असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात निर्दशानस आणून दिलं. तसेच भाषेची गळचेपी हा महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादातला कळीचा मुद्दा असताना त्याबद्दलचा ठराव मंजूर होताना किमान विधानसभा अध्यक्षांची मराठी नीट असायला हवी होती. अशा प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.
Read also
- “सत्तारांना फटकारल्यानंतर त्याचा त्रास भाजपलाच होईल, हे भाजपलाही माहितीय”
- “गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला”; विरोधकांचा विधानभवनाच्या परिसरात भजनी आंदोलन
- “नाममात्र विरोध करणारा सच्चा विरोधी पक्ष नेता अजित दादांच्या रूपात पहिल्यांदाच महाराष्ट्राने पाहिला”
- अन्यथा पुणे महापालिका जिंकणे भाजपला अवघड जाईल..! भाजप नेत्यांचं सुचक विधान
- रूपाली पाटील आमदार होण्याच्या वाटेवर, कसबा मतदार संघातून पोटनिवडणुक लढवणार?