मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्याबाबत सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका केली होती. सीबीआयची ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
“गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला”; विरोधकांचा विधानभवनाच्या परिसरात भजनी आंदोलन
अनिल देशमुख यांचा सीबीआय प्रकरणाचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. या प्रकरणी सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात जाण्यास संधी मिळावी म्हणून त्याला स्थिगिती देण्यात आली. त्यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु त्याची अद्यापही सुनावणी झाली नाही. त्यासाठी त्यांनी पुन्हा स्थिगिती वाढवण्याची विनंती केली आहे. ती आज संपली आहे. असं अनिल देशमुख यांचे वकिलांनी सांगितले आहे.
“नाममात्र विरोध करणारा सच्चा विरोधी पक्ष नेता अजित दादांच्या रूपात पहिल्यांदाच महाराष्ट्राने पाहिला”
त्यामुळे आज जर सीबीआयच्या स्थिगिती बाबत काही निर्णय घेतला नाही. तर उद्या अनिल देशमुख यांना तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यानंतर उद्या सर्व प्रक्रिया सुरू करून ते सर्व कागदपत्र जमा करू. त्यानंतर ते उद्या तुरूंगातून बाहेर येतील, असंही देशमुखांच्या वकिलांनी टीव्ही 9शी बोलतांना सांगितलं आहे.
Read also
- सीमा भागातील इंच इंच जागा घेऊ…! मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा
- “राज्यात सर्वत्र ही वसूली, सत्तारांची चौकशी करा”; एकनाथ खडसेंची सभागृहात मागणी
- “फडणवीसांनी लंवगी बाॅम्ब फोडला तर उद्धव ठाकरे कुठे दिसणारच नाही”; नवनीत राणा
- “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशाच तसं उत्तर, सीमाप्रश्नी ठराव एकमतानं मंजूर”
- “सत्तारांना फटकारल्यानंतर त्याचा त्रास भाजपलाच होईल, हे भाजपलाही माहितीय”