नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी सीमावादाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातला ठराव विधीमंडळात एकमतानं मंजूर झाला. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा विधानसभेत निर्धार करण्यात आला. तसेच यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“सत्तारांना फटकारल्यानंतर त्याचा त्रास भाजपलाच होईल, हे भाजपलाही माहितीय”
कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने दिल्लीत जाऊन कायदेशीर बाबी हाताळत आहे, केंद्र सरकारशी भेटीगाठी करत आहे, त्यापेक्षा दुप्पट गतीने महाराष्ट्र सरकारने हा प्रश्न हाताळावा, अशी सुचना केली. तसेच मांडलेल्या या सुचना याचिकेत समाविष्ट कराव्यात, अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी केली आहे.
“गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला”; विरोधकांचा विधानभवनाच्या परिसरात भजनी आंदोलन
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात विधानपरिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावाबद्दल सरकारसह पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा निकाल लागेपर्यंत मराठी भाषकांची नावे गावे केंद्रशासित करण्यासाठी सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करावी अशी मागणी मी आज केली. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या ट्विट प्रकरणी, ज्यांनी ट्विट केले ज्या व्यक्ती बाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे उपमुख्यमंत्री यांनी म्हटले होते, त्याबाबत गुन्हा दाखल झाला का याची माहिती मागितली. असंही अंबादास दानवे म्हणाले.
Read also
- मोठी बातमी…! अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येणार…?
- सीमा भागातील इंच इंच जागा घेऊ…! मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा
- “राज्यात सर्वत्र ही वसूली, सत्तारांची चौकशी करा”; एकनाथ खडसेंची सभागृहात मागणी
- “फडणवीसांनी लंवगी बाॅम्ब फोडला तर उद्धव ठाकरे कुठे दिसणारच नाही”; नवनीत राणा
- “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशाच तसं उत्तर, सीमाप्रश्नी ठराव एकमतानं मंजूर”