मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सातत्याने सापडत आहेत. यातच आता शिंदे सरकारमधील 4 मंत्र्यांवर शिवसेनेकडून गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सीमा भागातील इंच इंच जागा घेऊ…! मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा
कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर गायरान जमीन संदर्भात आरोप करण्यात आले आहेत. तर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर औद्योगिक घोट्याळा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर शेतजमीनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
“राज्यात सर्वत्र ही वसूली, सत्तारांची चौकशी करा”; एकनाथ खडसेंची सभागृहात मागणी
साताऱ्यातील नावली येथील शेतजमीनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप शंभुराज देसाईवर करण्यात आला आहे. शपथ पत्रात शेतजमीन म्हणून उल्लेख परंतु जमीनीवर प्रत्यक्ष बांधकाम करण्यात आलं आहे. तर देसाईंच्या सातबाऱ्यांवर बांधकामाचा उल्लेख कुठेच केला नाही. असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
“फडणवीसांनी लंवगी बाॅम्ब फोडला तर उद्धव ठाकरे कुठे दिसणारच नाही”; नवनीत राणा
दरम्यान, 2019 ला मंत्री असतांना संजय राठोड यांनी 5 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश दिले होते. गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कोणतेही तरतुद नाही. तसे आदेश उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तरी राठोड यांनी त्या जमीन संबंधित व्यक्तीला दिले होते.
Read also
- “स्वतंत्र विदर्भ करण्याचा फडणवीस ठराव आणणार होते, पण..” अजित पवारांचा मोठा गौप्सस्फोट
- “जर मी मनावर घेतलं, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन”, अजित पवारांचा बावनकुळेंना कडक इशारा
- दादा भुसेंची तरूणाला मारहाण, आव्हाडांचं ट्विट, दादा भुसे म्हणाले, सभागृहात प्रश्न विचारा
- सीमावाद..! कर्नाटक सरकारपेक्षा दुप्पट गतीने हा प्रश्न हाताळा
- मोठी बातमी…! अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येणार…?