मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीला अजून जवळपास ९ महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. मात्र, त्याआधीपासूनच मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापायला लागलं असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुका सध्याचा काळ पाहता, पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि यावरून भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलेली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला असून, मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी, ‘मुदतपूर्व निवडणुका, निवडणुका पुढं ढकलण्यासाठी महामारीचा बहाणा, २०११ च्या जनगणनेवर आधारित नवी प्रभाग रचना, ३० प्रभाग फोडण्याचा प्रयत्न, असे शिवसेनेचे डाव आहेत. मात्र, आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही,’ असा इशारा दिला आहे.
यावर आता मुंबईच्या महापौर आणि शिवसनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी, शेलारांच्या या आरोपांना उत्तर दिले असून, शिवसेना निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. भाजपला हव्या असतील, तर उद्याच निवडणुका घ्या, निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे, असे सांगत, आहेत त्याच महिन्यात निवडणूक होणार आहेत, मात्र, परिस्थिती पाहून अंतिम निर्णय तेव्हा घेतला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच, ‘शिवसेना सातत्याने काम करणारी संघटना आहे. लोकांना सेनेबद्दल आपलेपणा वाटतो. सेनेची लोकं त्यांना घरातलीच एक वाटतात. त्यामुळे आम्हाला निवडणुकीची आणि पराभवाची भीती वाटत नाही, उलट असं कुणाला वाटत असेल, तर ती त्यांची पोटदुखी आहे,’ असा टोलादेखील त्यांनी भाजपला लगावला आहे.
‘पहिल्या लाटेनंतर महापालिकेच्या निवडणुका घ्यायचा सेनेचा मनसुबा होता, असे मनसुबे भाजपचेच असतील. “खाई त्याला खवखवे”, अशी एक म्हण आहे. ती भाजपला तंतोतंत लागू होते. उगाच आरोप करायचे, आभास तयार करायचा. भाजपचा विरोध आणि आरोप करणं हा आता उद्योगच आहे. त्यांचे आरोप खोडून काढण्यात आम्हाला वेळ नाही,” असा हल्लबोलही त्यांनी भाजपवर केला आहे.
Read Also :
- ‘चंद्रकांत पाटलांचा तोल ढळला आहे, त्यांना…’ शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांची खरमरीत टीका
- कटकमिशनचे धंदे बंद करा! मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवरुन भाजपने केले शिवसेनेवर ४ गंभीर आरोप
- जळगांवात शिवसैनिकांनी अडवला देवेंद्र फडणवीसांचा ताफा… नंतर काय घडले
- भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘अच्छे दिन आने वाले है’
- ‘आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघा! म्हणूनसुद्धा मुख्यमंत्री पंतप्रधांनाना पत्र लिहितील’