नागपूर : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वीही त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर या पदासाठी राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर ,नाना पटोले, विजय वड्डेटीवार, संग्राम थोपटे यांची नावे चर्चेत आहेत.
याविषयी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून, मला हायकमांडने कोणतीही जबाबदारी दिली, तर ती मी स्वीकारेन, असे म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्षपद मी मागितलेले नव्हते. हायकमांडने मलाही जबाबदारी दिली. मी कोणतंही पद मागितले नाही. जर त्यांनी जबाबदारी दिली, त्याला प्रामाणिकपणे पूर्णत्वास नेणे ही माझी जबाबदारी आहे
मी कोणतेही पद मागितलेले नाही. मला कोणीही काहीही सांगितलेलं नाही. त्याबद्दल चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही, असेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे सध्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेतेपद, महसूल मंत्रीपद, आणि प्रदेशाध्यक्षपद अशी तीन पदे आहेत. त्यामुळे ते लवकरच दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Read Also :
- ‘भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही’
- ठाकरे सरकारची लगबग : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव सादर
- पत्नी गौरी गडाख यांच्या आत्महत्येनंतर प्रशांत गडाख यांना कोणाचा आधार?
- औरंगाबादेत साखर सहसंचालकांविरोधात दारूची बाटली, मटण देऊन अनोखं आंदोलन
- औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’ सुरू आहे – फडणवीस
- ‘संभाजीनगर’चा वापर केवळ निवडणुकीपुरता’, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा