अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून भाजपा नेते नितेश राणेंनी पुन्हा एकदा शिवसेने वर हल्ला चढवला आहे. शिवसेनेतील नेतेच आदित्य ठाकरेंना सुशांतसिंह राजपूत प्रकरणात गोवत असल्याचा आरोप त्यांनी लावला आहे.
‘शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना या प्रकरणात गोवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘अनिल परब यांनीच ट्विट करून १३ तारखेला पार्टी झाल्याचं सांगितलं. त्यामुळे अनिल परब यांना काय माहिती आहे, त्याची चौकशी व्हायला हवी. विरोधकांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन आरोप करावेत, असं आव्हान देऊन खासदार संजय राऊतच स्वत: आदित्य ठाकरेंचं नाव वारंवार घेत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवत आहेत,’ असा आरोप राणेंनी केला.
‘आभिनेत्री रिया चक्रवर्तीला फक्त आदित्य ठाकरेंचं नावच का घ्यावंसं वाटलं, त्यांना कधीच भेटलो हे का सांगावंसं वाटलं, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आम्ही सीबीआयला या दृष्टीनं तपास करण्याची विनंती करणार असून त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचीदेखील आमची तयारी असल्याचं ते म्हणाले. ‘आम्ही कोणीही आदित्य ठाकरेंचं नाव घेतलेलं नाही. आम्ही केवळ तरुण मंत्री असा उल्लेख केला. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. मग त्यांच्यापैकी आदित्य ठाकरे यांनीच का स्पष्टीकरण दिलं?,’ असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. मंत्रिमंडळात अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख हेदेखील तरुण मंत्री आहेत. मात्र त्यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही?, असा प्रश्नहीदेखील त्यांनी विचारला.