जालना : मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे कमालीचे चर्चेत आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असताना त्यांच्या जागेवर रश्मी ठाकरे या चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं म्हटलं होतं.
२ वर्षे माणसाच्या जीवनातील मोठा कालावधी, आता लॉकडाऊनसाठी नागरिक तयार नाहीत – चंद्रकांत पाटील
ते नेहमीच केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बोलत असतात. मात्र परवा ते दिल्ली दौऱ्यावर गेले होते. दिल्लीत गेल्यावर त्यांनी थेट रावसाहेब दानवेंची गळाभेट घेतल्याने सर्वच जण अचंबित झाले. त्यानंतर त्यांनी लगेचच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये युती होऊ शकते आणि त्याचा पूल नितीनजी गडकरी व अमित भाई शहा यांनी बांधावा असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा; खासदार संजय राऊत म्हणतात…
या सर्व घडामोडींवर रावसाहेब दानवे यांनी थेट भाष्य केले आहे. शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना मीच काय तर कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही अशी टीका दानवेंनी केली आहे. विशेष म्हणजे सत्तार दिल्लीत असे पर्यंत दानवेंनी सत्तार यांच्याबद्दल बोलणं टाळलं होतं. मात्र जशी त्यांची पाठ मागे फिरली तसं लागेचचं दानवेंनी सत्तार यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.
मला अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंना…; विद्यापीठ कायद्यावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
केंद्रीय रस्ते व विकास मंत्री नितीन गडकरी यांना उद्देशून केलेल्या विधानामागे देखील सत्तार यांचे काही विशेष कारण असेल. मतदार संघातील काही काम काढून घेण्यासाठी सत्तार यांनी युती संदर्भातील ते विधान केले असावे. गडकरींना खूष करण्याचा सत्तार यांचा प्रयत्न असला तरी नितीन गडकरी हे कमालीचे हुशार आहेत, असंही दानवे म्हणाले. तत्पुर्वी भाजपचे राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नया है वह, असा उल्लेख करत सत्तार यांच्या युती संदर्भातील वक्त्तव्याची खिल्ली उडवली होती.
Read also:
- चंद्रकांत पाटलांचे ‘युती’चे संकेत अन् महेश लांडगेंची शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी!
- नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला – चंद्रकांत पाटील
- काँग्रेसप्रणित पंजाब सरकारचा पिंपरी-चिंचवड भाजपाकडून निषेध; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील सुरक्षेबाबत बेफिकीरी
- मुंबई-पुण्यातील विद्यापीठांचे JNU करायचे आहे काय? आशिष शेलारांचा हल्लाबोल
- राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा