मुंबई : मुंबई-पुण्यातील विद्यापीठांचे जेएनयु करायचे आहे काय? यापुढची एल्गार परिषद आता विद्यापीठांमध्ये होणार आहे काय? राजाबाई टॉवरच्या बाजूला आता दुसरा मिनार उभा करणार आहात काय? विद्यापीठांची उपकेंद्रे शिवसेना शाखेतून वाटले जाणार आहेत काय? परीक्षांची काठिण्यपातळी, अभ्यासक्रम शिवसेना शाखेमध्ये ठरवणार आहात काय ? अशा आक्रमक प्रश्नांचा भडिमार करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
… अनाथांची मातृदेवता हरपली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली
महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाची कार्यकारिणीच्या बैठकीत आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध करणारा ठराव कार्यकारणीत मांडला त्या ठरावावर आमदार अँड आशिष शेलार प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.
पोलिसांचा बंदबोस्त नसल्यास …….. जय भीम ; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विट ने खळबळ
यावेळी त्यांनी विद्यापीठ कायद्यात बदल करताना विद्यमान सरकारने कसा राजकीय चंचूप्रवेश केला आहे. कसे राज्यपालांचे, कुलगुरूचे अधिकार सीमित केले आहेत व विद्यापीठांची स्वायत्ता धोक्यात आणली गेली आहे, यावर आमदार अॅड आशिष शेलार यांनी सविस्तर विवेचन केले. या विधेयकाच्या उद्देशांमध्ये ज्या बाबी सरकार सांगते आहे त्याचा आणि केलेल्या बदलांचा समन्वय नाही. किंबहुना हे म्हणजे बिरबलाच्या खिचडीसारखे आहे असे न म्हणता आघाडी सरकारचा विषय असल्याने हे बिरबलाच्या बिर्याणी सारखा प्रकार असल्याचे वर्णन त्यांनी केले.
त्यानंतर मात्र त्यांनी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब समाजातील विद्यार्थी, पत्रकार, बुध्दीवान, विचारवंत, पालक यांच्यापर्यंत घेऊन गेले पाहिजे याचीही मुद्देसुद मांडणी केली. या कायद्याचे भविष्यात विद्यापीठांवर होणारे परिणाम किती दाहक असतील या विषयावर बोलताना मात्र आमदार अॅड आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
Read also:
- राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- मला अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंना…; विद्यापीठ कायद्यावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
- मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा; खासदार संजय राऊत म्हणतात…
- २ वर्षे माणसाच्या जीवनातील मोठा कालावधी, आता लॉकडाऊनसाठी नागरिक तयार नाहीत – चंद्रकांत पाटील
- नागरिकांना सात दिवसांचे विलिनिकरण सक्तीचे; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती