मुंबई : यंदाचे हिवाळी अधिवेशन हे कमालीचे वादग्रस्त ठरले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारपणाने त्रस्त असल्या कारणाने त्यांनी हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती दर्शविली नव्हती. त्याच्या ऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी पार पाडली होती. हिवाळी अधिवेशनाला अनुपस्थित राहिल्याने उद्धव ठाकरेंवर विरोधी पक्ष भाजपने जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, रश्मी ठाकरे यांच्यातील एकाला मुख्यमंत्री करा असे खोचक सल्ले देखील दिले होते.
जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले – देवेंद्र फडणवीस
त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मौन सोडले आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची व्हिडीओकॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. यामध्ये शिवसेनेचे २२७ शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार हजर होते.
आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू अडचणीत; ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, काय आहे नेमक प्रकरण…
यावेळी ठाकरेंनी विरोधकांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. आज मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर आजारपणामुळे वैयक्तिक टीका करण्याचे काम विरोधी पक्षाकडून सुरु आहे. मात्र मी शांतपणे या टीका एकूण घेत आहे. माझा इतिहास पाहता मी सर्वांना वेळेवर उत्तर देईल आणि याचा हिशोब चुकता करेल असं ठाकरेंनी शिवसैनिकांना बजावून सांगितलं आहे. विरोधकांच्या टीकेचं मी पाहून घेईल तुम्ही फक्त निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. आपण केलेली कामं जनसामान्यांना समजून सांगा असं ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितलं आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील बैठकीला उपस्थित होते. त्यांनीही यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आहे.
Read also:
- पोलिसांचा बंदबोस्त नसल्यास …….. जय भीम ; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विट ने खळबळ
- रावसाहेब दानवे-अब्दुल सत्तारांची दिल्लीत गळाभेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण
- राज्यात लॉकडाऊन लागणार? टास्क फोर्सची बैठक संपली, काय ठरलं नेमकं, वाचा सविस्तर…
- कोकणात शिवसेनेमुळेच दहशत, खून, अपहरण या गोष्टी झाल्या असं संजय राऊत यांना म्हणायचे आहे का? – राणेंचा सवाल
- ‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं; अश्रूंचा टाहोफोडत सिंधुताईंच्या लेकीच आवाहन