नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे संबंध जगजाहीर आहेत, असं विधान खुद्द शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीच काही वेळापूर्वी केलं. त्यानंतर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचा दिल्लीतील गळाभेटीचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
… अनाथांची मातृदेवता हरपली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली
सध्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबित मागण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मात्र, भाजप-शिवसेना युतीचा पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बांधू शकतात, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी करून काही तास उलटत नाही तो, आता सत्तारांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची गळाभेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले – देवेंद्र फडणवीस
अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी जात दानवेंची गळाभेट घेतली. तसं सत्तार आणि दानवे यांची दोस्ती जुनीच आहे. पण काल शिवसेना-भाजप युतीबाबत सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी झालेली ही भेट राज्यात राजकीय भूकंप तर आणणार नाही ना?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या भेटीनंतर सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्या मतदारसंघातील रेल्वे संदर्भात मी त्यांना भेटण्यासाठी आलो. जळगाव-सोलापूर रेल्वे सुरू व्हावी म्हणून मी भेटण्यासाठी आलो होतो. मतदारसंघाचे खासदार झाले तर आनंद होईल. मी गंभीर नाही असं दानवे बोलतात. आता मी त्यांना रडत रडत सांगने, असं मिष्किल विधानही त्यांनी केलं.
Read also:
- राज्यात लॉकडाऊन लागणार? टास्क फोर्सची बैठक संपली, काय ठरलं नेमकं, वाचा सविस्तर…
- कोकणात शिवसेनेमुळेच दहशत, खून, अपहरण या गोष्टी झाल्या असं संजय राऊत यांना म्हणायचे आहे का? – राणेंचा सवाल
- ‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं; अश्रूंचा टाहोफोडत सिंधुताईंच्या लेकीच आवाहन
- आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू अडचणीत; ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, काय आहे नेमक प्रकरण…
- प्रदीप कंद यांच्या विजयाचे अजित पवारांनी एकदा आत्मपरीक्षण करावे; बाळा भेगडेंचा सणसणीत टोला