मुंबई : मागील काही दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पॅनलने महाविकास आघाडी प्रणित माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पॅनलचा उडवून टाकला होता. यानंतर कोकणच्या राजकारणात बरेच आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते.
सॉरी, सॉरी, सॉरी, सॉरी…; जितेंद्र आव्हाडांनी भाजप नेत्याची मागितली जाहीर माफी
शिवसेनेच्या सामना मुखपत्रातूनही नारायण राणे यांच्यावर जहरी टीका करण्यात आली होती. आता या टीकेला नारायण राणे यांनी देखील तिखट शब्दात उत्तर दिले आहे. नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की राऊत हे शिवसेनेत नंतर आले आहेत. त्यापूर्वी आम्ही शिवसेनेत होतो. संजय राऊत हे शिवसेनेला राज्यात चांगले दिवस आल्यानंतर शिवसेनेत शिवसैनिक म्हणून आले होते. तत्पूर्वी ते लोकप्रभा’मध्ये शिवसेनेवर जहरी टीका करत होते. अगदी तशीच टीका सध्या ते आमच्यावर करताना दिसत आहे.
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं निधन; पुण्यातील गॅलक्झी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
नवखे शिवसैनिक असल्याने त्यांना कदाचित शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे माहीत नाही. कोकणात हत्या झाली त्यांची यादी छापली, त्या घटना मी शिवसेनेत असताना म्हणजे २००५ साला पूर्वीच्या आहेत. एखादी अपवादात्मक घटना २००५ नंतरची असू शकते. म्हणजे, कोकणात शिवसेनेमुळे दहशत, खून, अपहरण, हे सर्व शिवसेनेमुळे, असं संजय राऊत यांना म्हणायचे आहे का?” असा तिखट सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. आता संजय राऊत राणेंच्या या प्रश्नाला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read also:
- ‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं; अश्रूंचा टाहोफोडत सिंधुताईंच्या लेकीच आवाहन
- आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू अडचणीत; ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, काय आहे नेमक प्रकरण…
- प्रदीप कंद यांच्या विजयाचे अजित पवारांनी एकदा आत्मपरीक्षण करावे; बाळा भेगडेंचा सणसणीत टोला
- जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले – देवेंद्र फडणवीस
- … अनाथांची मातृदेवता हरपली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली