मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीएत. मात्र, एका कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांसमक्ष भाजप नेत्याची जाहीर माफी मागितली आहे.
नितेश राणेंना मोठा दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे आदेश
मुंबईतील शहरातील बहुप्रतिक्षित बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झाली. नायगावमधील बीडीडी चाळीतील दोन जुन्या इमारती राज्याचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पाडण्यात आल्या. यावेळी भाजपचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांना निमंत्रण देण्यात आले नाही. याची सल कालिदास कोळंबकर यांनी मीडियासमोर बोलून दाखवली. यामुळे चांगलेच मानापमान नाट्य रंगले.
जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार – गोपीचंद पडळकर
शिवशाहीचे सरकार असताना बीडीडी चाळीतील पुनर्विकासात ३०० चा कार्पेट एरिया मिळत होता. फडणवीस सरकारच्या काळात तो ५०० चौरस फूट करण्यात आला. या कामाला आव्हाड यांनी गती दिली. ते प्रत्येक अडचणीला धावून येतात. फक्त या विभागाचा स्थानिक आमदार म्हणून मला कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला पाहिजे होते, या शब्दांत कालिदास कोळंबकर यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बाजूलाच उभ्या असणाऱ्या आव्हाड यांनी सॉरी, सॉरी, सॉरी, सॉरी… आता अजून काय पाहिजे?, असे म्हणत कोळंबकर यांची जाहीर माफी मागतली.
…तेव्हा शरद पवार म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? – चंद्रकांत पाटील
कालिदास कोळंबकर हे माझे जवळचे मित्र आहेत. ते कायम माझ्यासोबत असतात. म्हाडाकडून त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते वेळेत येऊ शकले नाहीत. यासाठी मी त्यांची क्षमा मागितली आहे. आता मित्र या नात्याने ते मला माफही करतील, असे आव्हाड यांनी म्हटले.
Read also:
- बारा तासांच्या तुरुंगवासानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराची सुटका; राजू कारेमोरे म्हणतात…
- पुणे जिल्हा बँकेत प्रदीप कंदांच्या रूपाने भाजपची ऐतिहासिक विजयी सलामी
- रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगलं सांभाळू शकतील; शिवसेना मंत्र्यांच महत्वपुर्ण विधान
- झुंड़ मे तो सुअर आते है; पोस्टरबाजी करत राणे समर्थकांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं
- …तर केंद्राच्या नियमांनुसार लॉकडाऊन लागणार; महापौर किशोरी पेडणेकरांचा इशारा