सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे. या सरकारने कोणतेच काम पूर्ण केले नाही. मराठा आरक्षणापासून ते धनगर आरक्षणापर्यंत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापर्यंत सर्वच प्रश्न रखडले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या हातालाच नव्हे, तर बुद्धीला लकवा मारल्याची स्थिती आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केली.
दानवेसाहेब तुम्ही देशाचे रेल्वे मंत्री आहेत की फक्त जालन्याचे, हे कळतंच नाही; इम्तियाज जलीलांचा टोला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली ते म्हणाले या सरकारमध्ये कोणताच ताळमेळ नाही यांच्याकडून एकही काम पूर्ण झाले नाही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटलेले नाहीत प्रत्येक समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे सरकारने केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.
राणे, भाजपकडून पैसा मिळाल्यानेच मी फिरायला गेलो होतो, असं वाईगंणकर म्हणत आहेत – सतीश सावंत
सध्याच्या महाविकास आघाडी सरकारची स्थिती याहीपेक्षा भयानक आहे. या सरकारने कोणतेच काम पूर्ण केले नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. ६० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी अजून सरकारला यावर तोडगा काढता आलेला नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना या सरकारने बंद पाडल्या, अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटील यांनी विकास आघाडी सरकारवर केली आहे.
Read also:
- जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार – गोपीचंद पडळकर
- नितेश राणेंना मोठा दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे आदेश
- अस्तित्व टिकविण्यासाठी आढाळराव पाटील घुटण्यावर; राष्ट्रवादीकडून शिरूरमधील शिवसेना संपविण्याचा डाव?
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना धक्का; बँकेच्या विजयाचा गुलाल घेत ठरले ‘श्रीमंत अपात्र मजूर’ उमेदवार
- सांगलीत बैलगाडा शर्यत होते मग लांडेवाडीत का नाही? नक्की पाणी मुरतय कुठं? आढळरावांची पोस्ट व्हायरल