पुणे : मागील आठवड्यात शिरूरमधील लांडेवाडीमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठी आणि कोर्टाच्या निकालानंतरची पहिली बैलगाडा शर्यत भरवण्यात येणार होती. दुसरीकडे यांचं दिवशी मावळमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडा शर्यत होणार होती.
आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल
माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे सुरुवातीपासूनच बैलगाडा शर्यतींवरून महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. दुसरीकडे अमोल कोल्हे हे नवखे असले तरी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा त्यांनी चांगलाच गाजवला आहे. याच कारणावरून दोघांमध्येही महाविकास आघाडी सरकार असताना समेट झाली नाही. शिवाजीराव आढळराव यांनी भरवलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी लांबून लांबून लोक आले असताना, कोरोनाच्या मुद्यावरून एन रात्री बैलगाडा शर्यत घेऊन नये, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता.
राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका ओबीसींविना घेऊ नये, बावनकुळेंची सुप्रीम कोर्टात धाव
या मागे राजकारण आहे असं आढळराव पाटील बैलगाडा शर्यत रद्द झाल्यानंतर बोलले होते. आता ते खरचं सिद्ध होतंय असं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सांगली जिल्हाधिकारी यांनी दि.३१ डिसेंम्बर रोजी आदेश काढून नांगोळे, ता.कवठे महाकाळ येथे ४ जानेवारी २०२२ रोजी बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे . याच दिवशी ३१ डिसेंम्बर रोजी पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी शर्यतींना दिलेली परवानगी रद्द केली. जर सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यत होऊ शकते तर लांडेवाडीत का नाही ? माझा संशय चुकीचा नव्हता हेच सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पुराव्यानिशी अधोरेखित झालंय. लोकहो, आता तुम्हीच ठरवा ‘नक्की पाणी मुरतय कुठं?’ अशी पोस्ट शिवाजीराव आढळरावांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून टाकली आहे.
Read also:
- राणे, भाजपकडून पैसा मिळाल्यानेच मी फिरायला गेलो होतो, असं वाईगंणकर म्हणत आहेत – सतीश सावंत
- दानवेसाहेब तुम्ही देशाचे रेल्वे मंत्री आहेत की फक्त जालन्याचे, हे कळतंच नाही; इम्तियाज जलीलांचा टोला
- “चंद्रशेखर बावनकुळेंच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही”, भुजबळांचा पलटवार
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणेंनी कशी जिंकली?, दीपक केसरकरांनी सांगितलं गुपित!
- एनसीबीमधून समीर वानखेडेंची अखेर बदली, ‘या’ खात्यात केली नियुक्ती