मुंबई – एनसीबीचे विभागीय संचालक (झोनल डायरेक्टर) समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचा मुंबई एनसीबीमधील कार्यकाळ संपला होता. आता त्यांना डीआरआय (डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) विभागामध्ये त्यांची बदली करण्यात आली. मुंबई एनसीबीच्या झोनल डायरेक्टर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी समीर वानखेडे याच विभागात होते. डीआरआय विभागातूनच त्यांना मुंबई एनसीबीमध्ये आणून झोनल डायरेक्टर करण्यात आले. आता त्यांची पुन्हा डीआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडेंची ऑगस्ट २०२० मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
याची ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नाही आणि म्हणे भावी खासदार; आमदार गोरंट्यालांची खोतकरांवर टीका
समीर वानखेडे यांचा मुंबई एनसीबीमधील कार्यकाळ संपला होता. मात्र, त्यांची मुंबई एनसीबीतून बदली करायची की एनसीबीमध्येच मुदतवाढ द्यायची? यामुळे निर्णयाला विलंब झाला. महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. महाराष्ट्र भाजपचा एक मोठा नेता समीर वानखेडे यांच्यासाठी दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांना मुंबई एनसीबीमध्ये कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय लांबणीवर पडत आहे. एक दिवसापूर्वी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर आज समीर वानखेडे यांच्या बदलीचे वृत्त समोर आले आहे.
समीर वानखेडे यांनी जातीची बोगस कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली. तसंच त्यांनी धर्म लपवला, असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले होते. तसंच समीर वानखेडे हे भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्याकडे महागडी घड्याळं आणि कपडे आणि इतर मौल्यवान वस्तू आहेत. यासह वसुलीचे गंभीर आरोप मिलक यांनी केले होते. पण मलिकांचे सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावले होते.
मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांचा झेंडा; सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवर झालेल्या छाप्यात समीर वानखेडेंनी पकडले होते. आर्यनला अटक झाली होती. यामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते. पण क्रूझवरील छाप्यावरून समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर अनेक प्रश्न उपस्थि करण्यात आले होते. आर्यनची अटक ही वसुलीसाठी करण्यात आली होती, असेही आरोप झाले.
यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी समीर वानखेडे चर्चेत आले होते. समीर वानखेडे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अंमली पदार्थांच्या संबंधावरून रिया चक्रवर्तीसह इतर कलाकारांना अटकही केली होती.
Read also:
- राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका ओबीसींविना घेऊ नये, बावनकुळेंची सुप्रीम कोर्टात धाव
- आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल
- म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा
- ‘एका बँकेवर विजय मिळवून राज्यात सत्ताबदलाची बोंब मारणे म्हणजे भाकडकथा’; सामनातून नारायण राणेंना चिमटे
- पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं