जालना : केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब यांच्या हस्ते काल जालना-हडपसर व किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आमदार कैलास गोरंट्याल हे देखील उपस्थित होते. काँग्रेसचे आमदार असूनही गेरंट्याल भाजपच्या कार्यक्रमात होते हे विशेषच.
राज्यपालांवर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोले
यावेळी भाषण करत असताना गेरंट्याल यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांच्या भावी खासदार अशा पोस्टरवरील उल्लेखाची खिल्ली उडवली आहे. गेरंट्याल म्हणाले की, मी गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार आहे. राजेश टोपे हे मंत्री आहेत. लोणीकर देखील मंत्री राहिलेले आहेत आणि आता आमदार आहेत. रावसाहेब दानवे हे खासदार आहेत आणि आता ते केंद्रीय मंत्री देखील झाले आहेत. मात्र आज मी पाहिले की भावी खासदारांचे शहरात ठिकठिकाणी बोर्ड लागलेले दिसत आहेत.
ठाकरे – पाटील विवाहला लागली कोरोनाची नजर, आता अंकिता पाटील देखील कोरोना पॉझिटिव्ह
ज्या भावी खासदाराला वीस वर्षांपासून नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्यांनी दहा वर्ष मंत्रिपद असताना कोणतीही कामे केली नाहीत. आम्ही जशी कामे करतो तशी त्यांनी फक्त तीन कामे तरी दाखवावीत. पंधरा वर्ष यांच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि यांना साध शेतकऱ्यांसाठी स्वछतागृह बांधता आलं नाही. याची ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नाही आणि हे भावी खासदार होण्याचे स्वप्न पाहत आहे असा घणाघात गेरंट्याल यांनी खोतकरांवर केला आहे. आता खोतकर या टीकेला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- शिवसैनिक म्हणून आम्हाला जगू द्या, दुसरी कोणतीही मागणी नाही; राष्ट्रवादीच्या कुरघोड्यांमुळे आढळराव हतबल?
- १३ महापालिकांत होणार ओबीसी आरक्षणाविना निवडणुका; निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना मोठा धक्का
- मी अजित पवारांचा मोठा फॅन; भाजप आमदार जयकुमार गोरेंनी उधळली दादांची स्तुतीसुमने
- सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात नवा वाद, बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव गायब
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा; यापुढे सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक