औरंगाबाद : केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब यांच्या हस्ते परवा जालना-हडपसर व किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे, आमदार बबनराव लोणीकर आदी नेते उपस्थित होते.
“आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!”
या कार्यक्रमात शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर जहरी टीका करण्यात आली होती. ही टीका आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली होती. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी यावर काही भाष्य केले नसले तरी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली आहे.
दानवे साहेब तुम्ही देशाचे रेल्वेमंत्री आहात की फक्त जालन्याचे रेल्वेमंत्री आहात हेच मला कळत नाही. औरंगाबाद येथे होणारी रेल्वे पीटलाईन दानवे यांनी जालन्याला नेले आहे. आगामी काळात खासदारकीची निवडणूक न लढवता महानगरपालिका अथवा नगरपरिषदेची लढवावी असा सल्ला जलील यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवेंना दिला आहे.
म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा
दानवेंनी ड्रायपोर्ट असूनही पिटलाईन जालन्याला नेली. हे अत्यंत चुकीचे आहे. रावसाहेब दानवे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांना असं करणं शोभत नाही असं देखील जलील यांनी यावेळी म्हटलं आहे. ओमायक्रॉनची वाढती पार्श्वभूमी पाहता राज्यात लॉकडाउन लावण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. याबाबद्दल जलील यांना विचारले असता त्यांनी म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या लाॅकडाऊनचे समर्थन करित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेने औरंगाबादेतील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळविले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
Read also:
- “चंद्रशेखर बावनकुळेंच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही”, भुजबळांचा पलटवार
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणेंनी कशी जिंकली?, दीपक केसरकरांनी सांगितलं गुपित!
- एनसीबीमधून समीर वानखेडेंची अखेर बदली, ‘या’ खात्यात केली नियुक्ती
- राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका ओबीसींविना घेऊ नये, बावनकुळेंची सुप्रीम कोर्टात धाव
- आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल