मुंबई : मागील कित्येक दिवसांपासून राज्याचे लक्ष हे सिंधुदुर्गाकडे लागले होते. अखेर काळ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला ईश्वरचिठीवर विजय मिळाला आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राणेंनी म्हटले होते की सिंधुदुर्ग ही फक्त भाजपच्या विजयाची सुरुवात आहे. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असेल आणि मुख्यमंत्री देखील आमचाच असेल.
म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक अपहरण, हाणमार, प्राणघातक हल्ले आणि इतर काही गोष्टींमुळे कमालीची गाजली होती. यामध्ये प्रमोद वाईगंणकर यांचे अपहरण झाले होते असा आरोप शिवसेनेने केला होता. राणेंच्या पॅनलचा जिल्हा बँकेत विजय झाल्यानंतर वाईगंणकर परतले आहेत आणि त्यांनी म्हटले आहे की माझं अपहरण झालंच नव्हतं.
म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा
यासंदर्भात शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही काही वाईगंणकर यांच्या वतीने पोलीस स्थानकात नव्हतो गेलो तर त्यांचे घरचे, त्यांची पत्नी यांनी फिर्याद दिली होती. नारायण राणे, भाजपकडून त्यांना चिक्कार पैसा मिळाला म्हणूनच ते आता पोलिसांत जाऊन मी फिरायला गेलो होतो असं बालिशपणाचं वक्तव्य करत आहेत.
आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल
बँकेचे माजी सतीश सावंत म्हणाले की हे सर्व ठरवून झालेलं आहे. ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती गायब झाल्यानंतर त्या कुटुंबाचे जर दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू असतील तर आपणच समजून घ्यायला हवं की ते जाणून बुजून गायब झाले आहेत. त्याचे बंधू हे शिवसेना कार्यकर्ते आहेत आणि तरीही त्यांनी असा धोखा देण्याचे काम केले आहे. सुरुवातीपासूनच ते विरोधक मला उचलून नेणार वगैरे वगैरे भाकडकथा ऐकवत होते असं देखील सतीश सावंत यांनी म्हटलं आहे. आज जे काही वाईगंणकर बोलत आहेत त्याचा बोलवता धनी आणि धन हे वेगळंच आहे आणि ते आम्हाला माहित आहे असं देखील सावंत यांनी म्हटलं आहे.
Read also:
- दानवेसाहेब तुम्ही देशाचे रेल्वे मंत्री आहेत की फक्त जालन्याचे, हे कळतंच नाही; इम्तियाज जलीलांचा टोला
- “चंद्रशेखर बावनकुळेंच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही”, भुजबळांचा पलटवार
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणेंनी कशी जिंकली?, दीपक केसरकरांनी सांगितलं गुपित!
- एनसीबीमधून समीर वानखेडेंची अखेर बदली, ‘या’ खात्यात केली नियुक्ती
- राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका ओबीसींविना घेऊ नये, बावनकुळेंची सुप्रीम कोर्टात धाव