मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असून, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते. यावरून विरोध पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांचा अन्य नेत्यांवर विश्वास नसेल, तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी रश्मी वहिनींकडे यांना द्यावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. याचाच धागा पकडत आता शिवसेनेच्या एका नेत्याने, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतील, असे म्हटले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
सांगलीत बैलगाडा शर्यत होते मग लांडेवाडीत का नाही? नक्की पाणी मुरतय कुठं? आढळरावांची पोस्ट व्हायरल
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळास लवकरच अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदाचे समसमान वाटप म्हणजे अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिल्याने युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यामुळे, भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्नही सातत्याने चर्चिला जात आहे.
रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. त्यांच्याकडे राज्याचे प्रमुखपद दिले तर कोणाचीही हरकत नसेल, असे शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार हे दिल्ली गेले होते, तेथे त्यांनी महत्त्वाच्या मंत्र्यांच्या भेटीही घेतल्या. दुसरीकडे, गडकरी राज्यात आले तर शिवसेना-भाजपचे मने जुळतील का? असा प्रश्न मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, नितीन गडकरी ज्यादिवशी मने जुळविण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशी खरोखर मने जुळतील, असे सत्तार यांनी म्हटले.
अस्तित्व टिकविण्यासाठी आढाळराव पाटील घुटण्यावर; राष्ट्रवादीकडून शिरूरमधील शिवसेना संपविण्याचा डाव?
शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यादिवशी निर्णय घेतील आणि नितीन गडकरी व अमित शाह यांनी पुढाकार घेतल्यास काहीही होऊ शकते. मी शिवसेनेचा साधा कार्यकर्ता आहे, पण भविष्यात युतीचा प्रस्ताव गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी पुढील अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव ठेवल्यास निश्चितच विचार विनिमय होऊ शकतो, असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रात भविष्यात कुठलेही परिवर्तन करायची असल्याच, त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी, असेही ते म्हणाले.
Read also:
- झुंड़ मे तो सुअर आते है; पोस्टरबाजी करत राणे समर्थकांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं
- …तर केंद्राच्या नियमांनुसार लॉकडाऊन लागणार; महापौर किशोरी पेडणेकरांचा इशारा
- …तेव्हा शरद पवार म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? – चंद्रकांत पाटील
- जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार – गोपीचंद पडळकर
- नितेश राणेंना मोठा दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे आदेश