पुणे : संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या कडक निर्बंध लागू केले जात आहेत. महाराष्ट्रामध्येही रुग्णसंख्येने चांगलाच जोर पकडला असून काल एका दिवसांत 18 हजार रुग्णसंख्येचा टप्पा राज्याने गाठलेला दिसून आला.
‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं; अश्रूंचा टाहोफोडत सिंधुताईंच्या लेकीच आवाहन
या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंधांबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केलं जाईल का, असा प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. याच प्रश्नावर आता भाजपचे प्रदेशाध्यशक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, लॉकडाऊनसाठी नागरिक आता तयार होणार नाहीत. २ वर्ष हा माणसाच्या जीवनातला फार मोठा कालावधी असून त्यांनी इतके दिवस सहन केले. त्यामुळे आतातरी सरकारने कसलेही कठोर निर्बंध लावले नाही पाहिजेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, लॉकडाऊनला आता कुणीही तयार होणार नाही. दोन वर्षे हा माणसाच्या आयुष्यातला फार मोठा कालावधी आहे. यामध्ये विद्यार्थी, व्यापारी, खेळाडू, उद्योजक, शेतकरी असे सगळेच जण भरडले गेले आहेत. एवढा मोठा समजाचा वर्ग दोन वर्षे सहन केल्यानंतर पुन्हा पुढची किती वर्षे हे सहन करणार? असा प्रश्न त्यांनी केलाय.
Read also:
- नागरिकांना सात दिवसांचे विलिनिकरण सक्तीचे; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती
- विरोधकांच्या टीकेला मी बघून घेईल, तुम्ही निवडणुकांवर लक्ष केंद्रित करा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश
- पोलिसांचा बंदबोस्त नसल्यास …….. जय भीम ; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विट ने खळबळ
- रावसाहेब दानवे-अब्दुल सत्तारांची दिल्लीत गळाभेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण
- राज्यात लॉकडाऊन लागणार? टास्क फोर्सची बैठक संपली, काय ठरलं नेमकं, वाचा सविस्तर…