मुंबई : शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. महाराष्ट्रातील या आघाडीचे पडसाद बिहारमध्ये उमटले. बिहारी जनतेला काँग्रेसेने शिवसेनेला सोबत घेणं आवडलं नाही. त्यामुळे काँग्रेसला बिहारमध्ये सपाटून मार खावा लागला. तेच आता मुंबईत घडेल.
मुंबईकर मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेची साथ सोडेल, असा दावा भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तुम्ही महापालिका निवडणुकीतही काँग्रेससोबत राहा. जनता तुमचा निश्चित पराभव करेल, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
काँगसने महाराष्ट्रात "हातात" "धनुष्यबाण" धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला…
आता…
महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या "घड्याळाचे"
काय सांगावे टायमिंग…?पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच!
त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/e0kK3EqfPg— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 11, 2020
काय आहे बिहार पॅटर्न
भाजप आमदार आशिष शेलार यांनी बिहार पॅटर्न मुंबई महापालिकेत लागू करण्याचे संकेत दिले आहेत. या बिहार पॅटर्ननुसार प्रचाराची धुरा फडणवीस यांच्याकडेच राहील. त्यासाठी निवडणुकीची खास रणनीती बनवण्यात येईल. बुथ लेव्हलपर्यंतची ही रणनीती राहणार आहे. विकासाची मुद्दे, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि ठाकरे सरकारचं अपयश आदी मुद्दे जोरकसपणे मांडण्यावर भाजपचा भर राहणार आहे.
बिहार निवडणुकीतही फडणवीस यांनी हीच रणनीती वापरली होती. तिच रणनीती मुंबई महापालिकेत वापरली जाणार आहे. फडणवीस यांनी बिहार निवडणुकीत आक्रमकपणे प्रचार केला होता. चौकसभांचा धडाका लावला होता. तोच पॅटर्न मुंबईत राबवला जाणार असल्याचे संकेत भाजपमधून मिळत आहेत.
भाजपमध्ये अनेक नेते जनतेवर थेट प्रभाव पाडू शकणारे आहेत. दुसरीकडे शिवसेनेत उद्धव ठाकरे वगळता इतर नेत्यांमध्ये मतदारांवर पाहिजे तितका प्रभाव पाडू शकत नाहीत. मात्र, शिवसेनेचं संघटन ग्रासरुटपर्यंत मजबूत असल्याने शिवसेनेच्या किल्ल्यांना भाजप कितपत खिंडार पाडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे. यासंबंधी जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे.
Read Also :
फक्त ‘या’ कारणामुळे आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमारांना झटका दिला: चिराग पासवान
स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन…”, राणेंची टीका
…म्हणून जयंत पाटलांनी ‘तेजस्वी यादवां’वर उधळली स्तुतिसुमने
सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला तर इतिहास घडेल…