नवी दिल्ली : केंद्र सरकाराने येत्या १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यातच इंडिया नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याची तयारी केंद्र सरकारने केली असल्याची चर्चा रंगली आहे. यावरून आता खासदार इत्मियाज जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिका केलीय.
हेही वाचा…शरद पवारांची ताकद वाढली, माजी आमदाराचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश, विरोधकांना बसला धसका
आम्ही पंतप्रधानांना संबोधित करताना प्राईम मिनिस्टर ऑफ बीजेपी असं म्हणायचं का ? असा सवाल जलील यांनी केलाय. भारत, इंडिया, हिंदूस्थान हा वाद सोडा शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, चीन याच्यावर पंतप्रधानांनी चर्चा करावी. अडाणींच्या मुद्यावर बोला, मला इंडिया ही पाहिजे आणि मला भारत देखील पाहिजे. केंद्र सरकरा केवळ नामकरणासाठी उरलं आहे. रस्त्याचं नाव बदला, बिल्डिंगचं नाव बदला, शहराचं नाव बदला आणि आता चक्क देशाचे नाव बदलायला निघाले आहेत. असा हल्लाबोलही जलील यांनी सरकारवर चढवला.
हेही वाचा…“तेव्हा डोकी फोडली जातात अन् खोके सरकारमध्ये जनरल डायर अवतरतात,” आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात
दरम्यान, इंडियाचं नाव भारत करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतात जी २० देशाची परिषद होत असून यासाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर देखील इंडिया ऐवजी भारताचा उल्लेख करण्यात आला आहे. तर मोदींच्या परदेशी दौऱ्यावर देखील इंडिया ऐवजी भारताचा उल्लेख करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अबब..! इंडिया नाव भारत करण्यासाठी ‘इतके’ कोटी खर्च होणार, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“माझे बाबा हट्टी, बाबांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर..,” जरांगे पाटलांच्या मुलीने सरकारला दिला इशारा
हेही वाचा…राज्यात काका-पुतण्याचा आणखी एक संघर्ष, काका अजित पवारांवर ‘या’ पुतण्याची पहिल्यांदाच टिका
हेही वाचा…“भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय”, सोमय्यांचा व्हिडीओ दाखवणाऱ्या संपादकावर गुन्हा दाखल
हेही वाचा…शरद पवारानंतर ठाकरेंची तोफ जळगावात धडाडणार, आगामी काळात सभांचा पाऊस पडणार