मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यापासून राज्यात, मराठा समाजामधून राज्य सरकार विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडं हे आरक्षण रद्द होण्याला कारणीभूत आघाडी सरकार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे, तर दुसरीकडे आधीच्या सरकारने या आरक्षणात आधीपासूनच काही त्रुटी ठेवल्या होत्या, त्यामुळे प्रयत्न करून देखील हे आरक्षण आम्ही न्यायालयात टिकवू शकलो नाही, असा आरोप ठाकरे सरकारकडून भाजपवर केला जात आहे.
दरम्यान, या सगळ्या गोंधळात, मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, १ जून ते ५ जून दरम्यान मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची वल्गना, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. यातच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष देखील आहेत, यांच्याविरोधात कोर्टात जाण्याची तयारी दाखवली आहे.
याबाबत अधिक बोलताना त्यांनी सांगितलं, “५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. परंतु, आजच्या दिवसापर्यंत राज्य सरकारकडून ते परत मिळवून देण्याबाबतची काही ठोस हालचाली झाल्या नाहीयेत. हे सरकार मराठा समाजाविरोधात सरळसरळ द्वेषाने वागत असून, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात येत्या मंगळवारी औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.”
- मराठा असो की मागासवर्गीय, ठाकरे सरकारचा आरक्षणाबाबत सावळा गोंधळ सुरुच
- “देंवेंद्रजी काय राव तुम्ही… तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोकणात जाव लागतयं”
- “ते आले…अन् न पाहताच निघून गेले.”
- मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आणि किती किलोमीटरचा हे मोजून सांगू का, याला दौरा म्हणायचं?
- हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला