मुंबई : आघाडी सरकार चालवत असताना निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनी भूमिका मांडायची असते, पण एकदा निर्णय झाला की सर्वांनी समाधानी राहायचं असतं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. महापालिका निवडणुकीसाठी त्रीस्तरीय प्रभाग रचनेवरून नाराजी व्यक्त करणारे महाविकास आघाडीतील नेते तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कान टोचले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
पुरात आतापर्यंत तब्बल 436 जणांचा मृत्यू; 22 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त, मुख्यमंत्री पाहणी करणार
अजित पवार म्हणाले, “आघाडी सरकार चालवत असताना निर्णय झाल्यावर नेहमी समाधानी राहायचं असतं. त्यात पुन्हा एकदा वेगळं वक्तव्य करुन कारण नसताना गैरसमज पसरायचे नसतात, असं माझं मत आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वजण आपली भूमिका प्रकर्षाने मांडत असतात. परंतू निर्णय घेतला की त्या निर्णयाचं समर्थनच आम्ही करत असतो. त्यामुळे हा त्रिसदस्यीय प्रभाग रचना निर्णय आता महाविकासआघाडी सरकारचा निर्णय झाला आहे. हाच निर्णय अतिम निर्णय राहणार आहे. आता त्याची अंमलबजावणी राज्यात होईल, असेही त्यांनी सांगितले.
आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
“काँग्रेसच्या प्रांताध्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. काँग्रेसच्या वतीने विधीमंडळात बाळासाहेब थोरात नेते आहेत. कॅबिनेटला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व इतर मान्यवर देखील होते. आम्ही राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि इतरजण होते. त्यामुळे याबाबत लगेच काही आकाशपाताळ कोसळलं आहे असं समजण्याचं कारण नाही,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार – उद्धव ठाकरे
अजित पवार यांनी प्रभाग रचनेतील मतमतांतरांबाबत आपलं निरीक्षणही मांडलं. ते म्हणाले, “प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. काही शहरांची परिस्थिती कुठल्या पक्षांना अनुकुल असते तेथे त्यांनी चार किंवा तीन प्रभाग असावे असं वाटतं. जिथं परिस्थिती अनुकुल नसते तिथं दोन किंवा एक प्रभाग असावा असं वाटतं. त्यानुसार मतं व्यक्त केली जातात. पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. त्यांनी घेतलेला निर्णय सर्वजण मान्य करतात.”
Read Also :
- शेतकऱ्यांना सर्वेतोपरी मदत करणार; पण सर्व माहिती मिळाल्यावरच, अरोदर नाही – अजित पवार
- ठरलं: ४ तारखेपासून शाळा सुरू होणार; परंतू, एका बेंचवर एकच विद्यार्थी असणार, वाचा नियमावली…
- काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेवर सोलापूरात गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण, वाचा सविस्तर…
- शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं, अंत पाहू नका, पंचनामे नकोत, तात्काळ मदत द्या – राणा जगजितसिंह
- शेतातील पिके पाण्याखाली, शेतकरी वाऱ्यावर, पालकमंत्री मात्र पुणे दौऱ्यावर – पंकजा मुंडे