मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी १९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येते २० वी ऊस परिषद होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी ‘जागर एफआरपीचा, आराधना शक्तीस्थळांची’ या आंदोलनाची घोषणा केली आहे. एफआरपी चे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात नवरात्रीपासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जोतिबाच्या डोंगरावरून आंदोलनाला सुरुवात होईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दसऱ्याला जेजुरी येथे मेळावा घेत आंदोलनाची सांगता होईल. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“शेतकऱ्यांना चार पैसे देण्याचं साखर कारखानदार यांच्या मनात नाही. त्यामुळे निती आयोगाला हाताला धरून एफआरपीचे तुकडे पाडण्याचे काम सुरू केले आहे. एफआरपीचे तुकडे करण्याचं काम भाजपनं केलं आणि तेच पुण्यात आंदोलन करत आहेत,” अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली.
मराठवाड्यात ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस; शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावला
“ऊस तुटल्यावर १४ दिवसात ६० टक्के एफआरपी त्यानंतर पुढच्या १४ दिवसात २० टक्के एफआरपी आणि त्यानंतर दोन महिन्यात २० टक्के एफआरपी द्यावी अशी शिफारस केली आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. आमचा दसरा कडवट झाला तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला.“ऊसाच्या एफआरपीसाठी घटस्थापनेपासून जोतिबाचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली जाईल. जोतिबा, अंबाबाई, बाळू मामा यांचं दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात होणार. १९ ऑक्टोबर रोजी २० वी ऊस परिषद होणार असून कुणाची परवानगी मागणार नाही,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
Read Also :
- पुरात आतापर्यंत तब्बल 436 जणांचा मृत्यू; 22 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त, मुख्यमंत्री पाहणी करणार
- सुरूवातीला राष्ट्रवादीत प्रवेश केला; आता शिवसेनेने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील मोठा नेता फोडला
- धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार – उद्धव ठाकरे
- रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका, बांधावर उतरा – पंकजा मुंडेचा टोला
- पुरामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार; उदय सामंत यांची माहिती