मुंबई : राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः माहिती दिली. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असं आवाहन सामंत यांनी केलं.
परिवहन मंत्री अनिल परब यांची आज ईडी चौकशी; स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुलींची घातली शपथ
उदय सामंत म्हणाले, “महाराष्ट्रात कालपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नद्यांना पूर आलाय. मराठवाड्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय, रस्त्यांवर पाणी आलंय, संपर्क तुटलाय. त्यामुळेच काही विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आल्या नाहीत. हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. त्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना मला सांगायचं आहे की त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही.”
माननीय @CMOMaharashtra उद्धव साहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. pic.twitter.com/lYP9QHqw7T
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2021
“आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेत. ज्या विद्यार्थ्यांची सीईटीच्या लिंकवर नोंदणी झालीय त्या सर्वांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. त्यामुळे पुरामुळे ज्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत त्यांची तारीख आज किंवा उद्या जाहीर करणार आहोत,” अशीही माहिती उदय सामंत यांनी दिली.
Read Also :
- गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना २२ जागा लढवणार – संजय राऊत
- एसटी पुरात बुडाली, तीन जन मेले, चालक बेपत्ता झाला; तरीही पालकमंत्री अजूनही वाऱ्यावरच
- पावसाने सगळ उद्धस्त केलं, राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा – नाना पटोले
- नाशिककरांना सतर्कतेचा इशारा: गंगापूर, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले, अनेक गावांत पाणी शिरण्याची शक्यता
- शिवसेना खासदार भावना गवळींवर अटकेची टांगती तलवार; ED ने पाठवली आणखी एक नोटीस