मुंबई : ज्यामध्ये सर्व कामगारांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक असेल. तसेच त्यांचा पगार हा डिजिटल पद्धतीने द्यावा लागेल. वर्षातून एकदा सर्व कामगारांची आरोग्य तपासणी देखील आता अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्योजकांचा व्यवसाय सुकर करण्यासाठीही अनेक तरतुदी आणल्या गेल्या आहेत.
कामगार मंत्री संतोष गंगवार म्हणाले की, ‘सध्याच्या कायद्यात दंडाची रक्कम अपघात झाल्यास सरकारच्या खात्यात जाते, परंतु आताच्या या नव्या कायद्यात दंडाची 50 टक्के रक्कम पीडिताला दिली जाईल.’
गंगवार म्हणाले की, ‘देशाच्या 73 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगार कायद्यात बदल करण्यात येत आहेत, जे मालक आणि कामगार दोघांसाठीही फायद्याचे ठरतील. वेतन कोड आधीपासून सूचित केले गेले आहे. जुने 29 कायदे ‘या’ चार संहितेत समाविष्ट केले गेले आहेत.’
Read Also :
लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख