राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार का असा प्रश्न विचारत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. मात्र शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ‘जय श्री राम’ म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहिलं. पार्थ पवार यांच्या या पत्रानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे
या पत्रात पार्थ पवार यांनी सुरुवातच ‘जय श्री राम!’ म्हणून केली आहे. “अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत,” असं मत व्यक्त केलं. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे असं आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केलं. पार्थ पवार यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. तसेच या मुद्द्यावर आपली भावना आणि भूमिका व्यक्त केली.
विशेष म्हणजे मागील काही दिवसांमध्ये पार्थ पवार यांनी काही मुद्द्यांवर पक्षाच्या पलिकडे जाऊन भूमिका घेतल्याचंही पाहायला मिळालं. महाविकासआघाडी सरकार वारंवार अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात राज्याकडे तपास राहावा असा आग्रह करत आहे. दुसरीकडे पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
Today is a historic day. Bhoomipoojan at Ayodhya today will be etched as civilisational awakening for Bharat. However, we need to steadfastly safeguard the secular fabric of our nation. We need to be gracious in this cultural victory. #JaiShreeRam
My thoughts: pic.twitter.com/pxhVyJS8rA
— Parth Pawar (@parthajitpawar) August 5, 2020