मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने किनारपट्टीला लागून असलेल्या गुजरात, महाराष्ट्र या राज्यांसोबतच इतर पाच राज्यांनादेखील जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली असून, काही ठिकाणी लोकांचे प्राण देखील गेले आहेत.
दरम्यान, हे वादळ आता महाराष्ट्रातून पुढे सरकले असून, ते गुजरात आणि दीवच्या किनारपट्टीला जाऊन धडकलं आहे. या चक्रीवादळाने तिथे देखील हैदोस घातला असून, प्रचंड प्रमाणात नुकसान घडवून आणलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या पाहणी दौऱ्यावर हवाई मार्गाने जाणार आहेत.
यावरून राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधानांवर टीका केली असून, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, “आज पंतप्रधान मोदी तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या भागाचा हवाई मार्गाने पाहणी दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातही तौक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले, मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत, हा सरळसरळ भेदभाव नाही का,” असा सवाल ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे.
Today PM Modi ji is taking an ariel survey of #CycloneTauktae affected areas of Daman, Diu and Gujarat.
Why not the same of the areas affected in #Maharashtra ?
Is this not clear cut discrimination ?— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 19, 2021
तौक्ते वादळाने मागील तीन ते चार दिवसांपासून भारताच्या पश्चिमी किनारपट्टीला तडाखा दिला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दीवला भेट देऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची हवाई मार्गाने पाहणी करणार आहेत. भावनगर, उना, दीव,जाफराबाद आणि महूआ या भागाची हवाई पाहणी देखील पंतप्रधान करणार असून, अहमदाबाद इथं आढावा बैठक घेणार आहेत.
Read Also :
- ‘शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती’; मिसेस फडणवीसांचं पुन्हा ट्वीट
- मराठा आरक्षण.! संभाजीराजे आज करणार भूमिका जाहीर?
- ‘खोटं बोलण्यात वेळ घालवू नका, लोकांचे जीव वाचवा’
- तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, वडेट्टीवार यांचे निर्देश
- ‘…त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिकेचा निर्णय घेणार’