नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला मोदी व्हायरस किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन एका टूलकिटद्वारे करण्यात येत आहे. या कथित व्हायरल टूलकीटवरून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने काँग्रेसनेवर देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. तर काँग्रेसने हे टूलकीट फेक असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट करत हे टूलकीट फेक असल्याचे म्हटले आहे. तसेच, खोटं बोलण्यात वेळ न घालवता लोकांचे जीव वाचावावे, असे त्यांनी म्हटले आहे.
Don’t waste time spreading lies, wake up and start saving lives. pic.twitter.com/4v6eQ1zV2m
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 18, 2021
फेक टूलकिटचा फोटो शेअर करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका. जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा.’
दरम्यान, या कथित टूलकीटवरून भाजप आणि काँग्रेस नेते आमने सामने आले आहेत. महाराष्ट्रात देखील यावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. आता या प्रकरणी काँग्रेसने जेपी नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणी, बीएल संतोष यांच्यासह काही भाजप नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Read Also :
- तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, वडेट्टीवार यांचे निर्देश
- ‘…त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिकेचा निर्णय घेणार’
- लसीकरणात महाराष्ट्र अव्वल, पार केला 2 कोटींचा टप्पा
- ‘काँग्रेसने दोषारोपांच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर येऊन…’, चंद्रकांत पाटलांचे कळकळीचे आवाहन
- ‘काँग्रेसकडून दरवेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते?’