मुंबई : काँग्रेसच पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर एक कथित टूलकीट व्हायरल होत आहे. कोरोनाच्या नावाखाली काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी आणि देशाची बदनामी केली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे हे टूलकीट बनावट असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आता यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस केवळ राजकीय विरोधासाठी देशात असंतोष निर्माण करण्यासाठी फेक आणि नकारात्मक बातम्या पसरवत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशाची फाळणी आणि विरोधकांबद्दल गरळ ओकत राहणे यावर काँग्रेसने प्रभुत्व मिळवले आहे. भारत कोरोनाविरुद्ध लढत असतानाच काँग्रेसची सुरु असलेली कृष्णकृत्ये उघड झाली आहेत. काँग्रेसने दोषारोपांच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर येऊन देशहितासाठी उत्तम-उन्नत कार्य करावे असे माझे कळकळीचे आवाहन आहे.
संपूर्ण भारत कोरोनाशी लढण्यासाठी एकजूट झाला आहे आणि त्याचवेळी काँग्रेस केवळ राजकीय विरोधा साठी कोरोनाशी चाललेल्या लढाईत साथ न देता, देशात असंतोष निर्माण करण्यासाठी फेक आणि नकारात्मक बातम्या पसरवत आहे. हे कृत्य लांच्छनास्पद आहे, अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटलांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर आणि #PMCares वर आरोप , तज्ञांवर शंका-कुशंका, लसीकरणाबाबत गोंधळ निर्माण करण्याला चालना,व्हेंटिलेटर कॉंट्रोव्हर्सी..काँग्रेसची कृष्णकृत्ये थांबतच नाहीत. या दुष्कृत्यांचे फळ वेळ येताच त्यांना भारतीय जनता अवश्य देईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read Also :
- ‘काँग्रेसकडून दरवेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते?’
- ‘भाजप अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष’
- ‘…तेव्हा विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता?’
- महिन्याभरातच लसीचा दुसरा डोस घेतला? राजेश टोपे म्हणाले…
- “निवडणुका उद्या लावा, मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून निवडून येतील”