मुंबई : काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान कथित टूलकिट समोर आली होती. आता कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नावाने कथित टूलकिट व्हायरल होत आहे. करोना व्हायरसवरून पंतप्रधान मोदी आणि देशाला बदनाम करण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरून आता महाराष्ट्रात देखील राजकारण तापले आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या कथित टूल किटवरून काँग्रेसवरून निशाणा साधला आहे. काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते, अश टीका भातखळकर यांनी केली आहे.
भातखळकरांच्या या टीकेला आता काँग्रेसने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले असून, भाजप अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष असल्याची टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.
भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष आहे. सदर टूलकिट हे बनावट आहे. @INCIndia तर्फे @JPNadda व
, @sambitswaraj वर गुन्हा दाखल केला जाणार आहे त्यात @BhatkhalkarA यांचे नाव ही देऊ. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे https://t.co/5LZhWbgH9N— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 18, 2021
सचिन सावंत म्हणाले की, भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष आहे. सदर टूलकिट हे बनावट आहे. काँग्रेसतर्फे जे पी नड्डी आणि संबित पात्रा यांच्यावर वर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यात अतुल भातखळकर यांचे नाव ही देऊ. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, या कथित टूलकिट प्रकरणी काँग्रेसने भाजप नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात जेपी नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणी, बीएल संतोष यांच्यासह काही नेत्यांविरोधात काँग्रेसने तक्रार केली आहे.
Read Also :
- ‘…तेव्हा विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता?’
- महिन्याभरातच लसीचा दुसरा डोस घेतला? राजेश टोपे म्हणाले…
- “निवडणुका उद्या लावा, मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून निवडून येतील”
- खतांच्या दर वाढीवरून चंद्रकांत पाटीलांनेही लिहिले अखेर केंद्र सरकारला पत्र, म्हणाले…
- मराठा आरक्षण : शिवसंग्रामचा ठाकरे सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम