मुंबई : आज भाजपची मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला भाजप खासदार नारायण राणे, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील, विनायक मेटे, चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांना, काँग्रेसचा टूल किट करत असलेला वापर आणि राहुल गांधी पंतप्रधानांवर करत असलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा पाटील यांनी त्यावर भाष्य करताना, “जर देशात लोकसभेच्या निवडणुका उद्या घेतल्या, तर मोदी ४०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवतील”, असा दावा केला आहे. तसेच, “पंतप्रधानांना बदनाम करण्याचे काँग्रेस षडयंत्र रचत असल्याचा आरोप देखील तत्यांनी यावेळी केला आहे.
तसेच, यावेळी मराठा आरक्षणाबाबत बोलताना पाटील म्हणाले, “हा कायदा जर अयोग्य असता तर नोकऱ्या, प्रवेश कोर्टाने कसे दिले असते, मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकार बाजू मांडण्यास कमी पडले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला भाजप पूर्णपणे पाठींबा देणार असून, यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून, हा कायदा कसा योग्य आहे, या गोष्टी या सरकारला आम्ही दाखवून देऊ. परंतु, यासाठी नवा मागासवर्गीय आयोग हा राज्य सरकारलाच नेमावा लागेल. मराठा समाज मागास आहे हे देखील सिद्ध करावं लागेल”, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
यावेळी त्यांनी, “ठाकरे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. लॉकडाऊननंतर परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घ्यायचा असतो, परंतु, हे सरकार कायम लॉकडाऊन वाढवण्याच्याच गोष्टी करत आहे. त्यामुळे आता मराठा समाज शांत बसणार नाही. मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल, हे आंदोलन सरकारला पेलवणार नाही, झेपणार नाही, त्यामुळे ही लॉकडाऊनची खेळी केली जात आहे”, असा थेट आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
Read Also :
- खतांच्या दर वाढीवरून चंद्रकांत पाटीलांनेही लिहिले अखेर केंद्र सरकारला पत्र, म्हणाले…
- मराठा आरक्षण : शिवसंग्रामचा ठाकरे सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम
- “व्हेंटीलेटर्सचा गुंता सुटता सुटेना”, फडणवीस म्हणतात, “केंद्राने व्हेटिंलेटर दिले पण राज्य सरकारने ते…”
- आदित्य ठाकरेंच मोठ वक्तव्य; राज्यात १ जुननंतरही लॉकडाऊन कायम राहणार?
- “सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते, वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते.”