पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर, राज्य सरकारला आणि मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे समाजातील समाजातील गरीब, अल्पभूधारक वा भूमिहीन, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी आणि इतर वर्गांमध्ये राज्य सरकार विरोधात संतापाची भावना तयार झाली आहे.
दरम्यान, या भावनेला आणि मराठा समाजाच्या उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने १ ते ५ जूनदरम्यान आंदोलनाची हाक देण्यात आली असून, बीडमधून पहिला ‘मराठा आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. यासाठी आज शिवसंग्रामच्या वतीने, ठाकरे सरकारने आरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका घ्यावी आणि अचूक पावले उचलावीत, तसेच वरील तातडीने हा प्रश्न सोडवावा यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यासाठी, राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी व सर्व तालुक्यांच्या तहसीलदार यांना ‘इशारा निवेदन’ देण्यात आले आहे.
पुण्यात देखील, पुणे शहर व जिल्हा शिवसंग्रामच्या वतीने, जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना इशारा निवेदन देण्यात आले. शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, युवक शहराध्यक्ष नितीन ननावरे, चेतन भालेकर,किशोर मुळूक, राजेंद्र मेमाणे आदींनी हे निवेदन दिले.
तसेच, हवेली तालुक्याच्या कार्यालयात देखील नायब तहसीलदार अजय गेंगाणे यांना, शिवसंग्राम सामाजिक न्यायचे प्रदेश उपाध्यक्ष कल्याणराव अडागळे सा.न्यायचे शहराध्यक्ष विनोद शिंदे, अभिजित म्हसवडे, सागर फाटक, अमित शिंदे, लहू ओहोळ, दिलीप पेठकर, अशोक पाटणे यांनी इशारा निवेदन सादर केले.
Read Also :
- “व्हेंटीलेटर्सचा गुंता सुटता सुटेना”, फडणवीस म्हणतात, “केंद्राने व्हेटिंलेटर दिले पण राज्य सरकारने ते…”
- आदित्य ठाकरेंच मोठ वक्तव्य; राज्यात १ जुननंतरही लॉकडाऊन कायम राहणार?
- “सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते, वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते.”
- शेतकऱ्यांवर लादलेली खतांची दरवाढ, केंद्र सरकारने मागे घ्यावी; शरद पवारांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र
- ‘मोदींची प्रतिमा वाचवण्यासाठी तरी तकलादू व्हेंटीलेटर्स चालू करून दाखवा’