मुंबई : देशात महामारीची दुसरी लाट वेगानं फैलावत असतानाच, अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय सोयी-सुविधांची वानवा जाणवत असल्याचे भीषण चित्र दिसून येत आहे. यामुळे दुर्दैवाने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून, देशभरात जाणवत असलेल्या या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहायता निधीमधून राज्यांना नुकतेच अद्ययावत व्हेंटिलेटर्सचे वितरण करण्यात आले आहेत.
दरम्यान, या अत्याधुनिक व्हेंटिलेटर्समध्ये अनेक दोष आढळले असून आहेत, यामुळे ते वापराविना पडून असल्याची माहिती अनेक ठिकांणांहून मिळत आहे. यांचा वापर करणे घातक असून, असे व्हेंटिलेटर वापरण्यासाठी अयोग्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर टीका केली असून, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपला व्हेंटिलेटर चालू करुन दाखवण्याचे आव्हान दिले आहे.
#PMCares फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो. मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या फडणवीस जी आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे असे आमचे आव्हान आहे pic.twitter.com/8lDE6v6ASp
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 18, 2021
‘तकलादू आणि सदोष व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकार, जनतेच्या पैशाचा अपव्यय आणि जीवाशी खेळ करत आहे. खोटे बोलून गुजरातमधील भाजप नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरु सरकारकडून आणि भाजप नेत्यांकडून सुरु आहे. यांना जनतेच्या जीवापेक्षा मोदींची प्रतिमा महत्वाची वाटते आहे. माझे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खुले आवाहन आहे, त्यांनी हे व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे, असं सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
Read Also :
- रक्षा खडसेंचा मोदी सरकारला घरचा आहेर.! म्हणाल्या खताच्या किंमती…
- उजनीचे पाणी इंदापूरला पाणी देणाऱ्या शासन निर्णयाची होळी करण्याचा संघर्ष समितीचा निर्धार
- तौक्ते आणि यूपीएससीवरून, भाई जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक चकमक
- “भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”
- “नुसता फोन फिरवला तरी शंभर वेळा हजर होईन” म्हणणारे प्रताप सरनाईक गायब!