मुंबई : देशात महामारीची दुसरी लाट वेगानं फैलावत असतानाच, अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय सोयी-सुविधांची वानवा जाणवत असल्याचे भीषण चित्र दिसून येत आहे. यामुळे दुर्दैवाने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून, देशभरात जाणवत असलेल्या या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहायता निधीमधून राज्यांना नुकतेच अद्ययावत व्हेंटिलेटर्सचे वितरण करण्यात आले आहेत.
दरम्यान, या अत्याधुनिक व्हेंटिलेटर्समध्ये अनेक दोष आढळले असून आहेत, यामुळे ते वापराविना पडून असल्याची माहिती अनेक ठिकांणांहून मिळत आहे. यांचा वापर करणे घातक असून, असे व्हेंटिलेटर वापरण्यासाठी अयोग्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर टीका केली असून, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपला व्हेंटिलेटर चालू करुन दाखवण्याचे आव्हान दिले आहे.
यावरून, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून, एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी, ‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला सुमारे ५ हजार व्हेंटिलेटर्स दिले. पहिल्या लाटेत व्हेंटिलेटर्सची मागणी अचानक वाढली. परदेशातदेखील तेव्हा व्हेंटिलेटर्सचा तुटवडा होता. त्यामुळे देशात त्यांची युध्दपातळीवर निर्मिती करण्यात आली. परिणामी त्यांची रचना काहीशी गुंतागुंतीची आहे. मात्र, त्यांचा वापरणं करता आपण ते गोदामात थप्पी मारून ठेवले तर कसे होणार,’ असा टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
तसेच, ‘राज्यभरातील ९०% व्हेंटिलेटर्स चालू अवस्थेत आहेत. १० % नादुरूस्त असले तरी, त्यांची दुरूस्ती करण्यासाठी इंजिनिअर पाठवले गेले आहेत. त्यामुळे या विषयावरून राजकारण करण्याचा प्रयत्न या काळात तरी कुणी करू नये. निदान मला तरी या आपत्तीत राजकारण किंवा टीका टिप्पणी करण्यात स्वारस्य नाही. आधी प्रत्यक्ष परिस्थीती पहा आणि मगच राज्य सरकारला सुचना द्या, यावर माझा भर असतो.’ असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.
Read Also :
- “सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते, वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते.”
- शेतकऱ्यांवर लादलेली खतांची दरवाढ, केंद्र सरकारने मागे घ्यावी; शरद पवारांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र
- ‘मोदींची प्रतिमा वाचवण्यासाठी तरी तकलादू व्हेंटीलेटर्स चालू करून दाखवा’
- रक्षा खडसेंचा मोदी सरकारला घरचा आहेर.! म्हणाल्या खताच्या किंमती…
- तौक्ते आणि यूपीएससीवरून, भाई जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक चकमक