मुंबई : महामारीच्या आकस्मिक संकटाने आधीच शेतकरी राजाचे कंबरडे मोडले असताना, आता मोदी सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ केली असून, शेतकरी मोठ्या मुश्किलीत सापडला आहे. यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानीं देखील केंद्रातल्या आपल्याच सरकारला पत्र लिहिले आहे.
यात त्यांनी, ‘मागच्या वर्षभरापासून महामारी आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यातच खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किंमती वाढवल्या तर ते शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानकारक ठरेल. देशात मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी देखील खरीपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. या बाबी लक्षात घेऊन, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी लवकरात लवकर अनुदान घोषित करावे’, अशी मागणी केली आहे.
खतांची किंमत वाढवली जात असल्याचा चुकीचा संदेश विरोधी पक्षाद्वारे शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात आहे. मात्र कंपन्यांनी खतांच्या किंमती खरच वाढवल्या तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री @nstomar जी यांना पत्राद्वारे याविषयी त्वरित पाऊल उचलण्याचे आवाहन केले. pic.twitter.com/4d5FmlFrAQ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 18, 2021
तसेच, ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आले आहे. या आधी देखील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, प्रभावी निर्णय घेतले आहेत आणि महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. परंतु, अचानकपणे रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी किंमती वाढवल्या तर, विरोधक या गोष्टीचा फायदा घेऊन अफवा पसरवू शकतात. त्यामुळे, आपण शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून, योग्य तो निर्णय घ्यावा’, अशी विनंती देखील त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय खते व रसायने मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
Read Also :
- मराठा आरक्षण : शिवसंग्रामचा ठाकरे सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम
- “व्हेंटीलेटर्सचा गुंता सुटता सुटेना”, फडणवीस म्हणतात, “केंद्राने व्हेटिंलेटर दिले पण राज्य सरकारने ते…”
- आदित्य ठाकरेंच मोठ वक्तव्य; राज्यात १ जुननंतरही लॉकडाऊन कायम राहणार?
- “सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते, वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते.”
- शेतकऱ्यांवर लादलेली खतांची दरवाढ, केंद्र सरकारने मागे घ्यावी; शरद पवारांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र