मुंबई : गेल्या काही दिवसात वाढलेली कोरोनारुग्ण संख्या आता कमी होत चालली आहे. मात्र दुसरीकडे लसींअभावी अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहे. नागरिकांना लसीसाठी नोंदणी करताना देखील समस्या येत आहे. सरकारने लसीच्या दोन डोसमधील देखील अंतर वाढवले आहे. मात्र, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महिन्याभराच्या अंतराने दोन डोस घेतल्याने आता प्रश्न उपस्थित केले जात आहे.
एकीकडे सर्वसामान्यांसाठी लस घेण्यासाठी दोन डोसमधील अंतर वाढवले आहे. तर आरोग्यमंत्र्यांनी महिन्याभराच्या आत दोन डोस कसे घेतले ? असा सवाल सोशल मीडियावर केला जात आहे. यावर आता राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आरोग्यमंत्री यांनी कोव्हीशिल्ड नाही तर कोव्हॅक्सिन लस घेतली यामुळे 30 दिवस कालावधी नंतर दुसरी लस घेतली, असे स्पष्टीकरण राजेश टोपेंच्या कार्यालयातून देण्यात आले आहे. यासंदर्भात लोकमत न्यूज१८ने दिले आहे.
राजेश टोपेंनी १९ एप्रिलला लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर १८ मे ला त्यांनी दुसरा डोस घेतला. यासंदर्भात त्यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
Read Also :
- “निवडणुका उद्या लावा, मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून निवडून येतील”
- खतांच्या दर वाढीवरून चंद्रकांत पाटीलांनेही लिहिले अखेर केंद्र सरकारला पत्र, म्हणाले…
- मराठा आरक्षण : शिवसंग्रामचा ठाकरे सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम
- “व्हेंटीलेटर्सचा गुंता सुटता सुटेना”, फडणवीस म्हणतात, “केंद्राने व्हेटिंलेटर दिले पण राज्य सरकारने ते…”
- आदित्य ठाकरेंच मोठ वक्तव्य; राज्यात १ जुननंतरही लॉकडाऊन कायम राहणार?