मुंबई : राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने २७ जूनला हणारी ही नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यूपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले.
काही दिवसांपूर्वी एमपीएससीने देखील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी पुण्यात आंदोलन केले होते. हाच धागा पकडत भाई जगताप यांनी पडळकरांवर निशाणा साधला.
राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे…
केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत??
आता दातखिळी बसली आहे का??#महाराष्ट्रद्रोही
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) May 17, 2021
भाई जगताप म्हणाले की, राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे…केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत?? आता दातखिळी बसली आहे का?, असा सवाल त्यांनी पडळकरांना केला होता.
नाव बदलल्याने जसे ‘#भाई’ होता येत नाही तसेच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येत नाही…
काल चक्री वादळात तुंबलेली मुंबई थांबली, पडली, झडली, खचली, तेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता?#वसूली_सरकार#MPSC#BJPMaharshtra— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) May 18, 2021
जगताप यांच्या या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी देखील ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिले. नाव बदलल्याने जसे ‘#भाई’ होता येत नाही तसेच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येत नाही…काल चक्री वादळात तुंबलेली मुंबई थांबली, पडली, झडली, खचली, तेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता?, असा खोचक सवाल करत पडळकरांनी पलटवार केला आहे.
Read Also :
- महिन्याभरातच लसीचा दुसरा डोस घेतला? राजेश टोपे म्हणाले…
- “निवडणुका उद्या लावा, मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून निवडून येतील”
- खतांच्या दर वाढीवरून चंद्रकांत पाटीलांनेही लिहिले अखेर केंद्र सरकारला पत्र, म्हणाले…
- मराठा आरक्षण : शिवसंग्रामचा ठाकरे सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम
- “व्हेंटीलेटर्सचा गुंता सुटता सुटेना”, फडणवीस म्हणतात, “केंद्राने व्हेटिंलेटर दिले पण राज्य सरकारने ते…”