नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. या घटनेने पुन्हा एकदा 2011 साली दिल्लीतील निर्भया प्रकरणाची देशाला आठवण करून दिली. हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुपचूप पीडित मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून केला जात आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निर्भया प्रकरणानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे.
We won’t forget #Hathras Ki Nirbhya!
हम #हाथरस की निर्भया को नही भूलेंगे !#HathrasHorror pic.twitter.com/a0h70R37ZP
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 3, 2020
निर्भया प्रकरणाविषयी नरेंद्र मोदींनी ट्विट केले होते की, निर्भयला विसरू नका. बेरोजगार तरूणांना विसरू नका. शेतकरी आत्महत्या करत असलेल्या घटना विसरू नका. आपलले जवान मारले गेले ते विसरू नका.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना मोदींनी केलेले हे ट्विट हाथरस प्रकरणानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुर जेवाला यांनी या ट्विटचे स्क्रिनशॉट शेअर केला असून, काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून देखील हे ट्विट रिट्विट करण्यात आले आहे.
दरम्यान, आज काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी हाथरस घटनेतील पीडिताच्या कुटुंबियाची भेट घेतली.