पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात या प्रश्नी टी-टिप्पणी सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप त्यांची भेट झाली नाही. आता या दोन्ही नेत्यांची आजपर्यंत भेट का होऊ शकली नाही ? या मागचे कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नसल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी राजीनाम्याची देखील तयारी दर्शवली आहे. राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन’, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
Read Also :