मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. या कालावधीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील नाराजी अनेकदा उघडपणे समोर आली आहे. आता पुन्हा एकदा ‘हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही’, अशा स्पष्ट शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडीतील चित्र स्पष्ट केले आहे.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला दीड वर्षाच्या कार्यकाळात कोरोना महामारीपासून ते गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांपर्यंत अनेक आव्हानांना समोर जावे लागले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील सातत्याने काँग्रेसला सल्ले देताना पाहायला मिळतात. यावर आता नाना पटोले यांनी भाष्य केले आहे.
आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे, अशा स्पष्ट शब्दात नाना पटोलेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशाराच दिला आहे. त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात भाष्य केले आहे.
भाजप आणि शिवसेनेची भांडण ही नळावरच्या भांडणांप्रमाणे होती. देश संकटात असताना देशाचे प्रमुख हे राज्य ते राज्य जिंकण्यासाठी फिरत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून नको असतील तर नितीन गडकरी हा पर्याय आहेच. गडकरी पंतप्रधान झाले तर आनंदच होईल. फडणवीस हा फसवणारा माणूस आहे, अशा शब्दात नाना पटोलेंनी या मुलाखतीत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.
Read Also :
- ‘अटक झालेल्या जावयाची सुटका होत नसल्याने नवाब मलिकांचे डोकं फिरलय’
- ‘पंतप्रधान मोदी भावूक झाले हा तर ठरवून केलेला कार्यक्रम’
- ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मंद गतीचे झालेत’
- शेतकऱ्यांची देशव्यापी आंदोलनाची हाक; काँग्रेस, राष्ट्रवादीसह 12 पक्षांचा पाठिंबा
- ‘बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली’