मुंबई : कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावरून मोदींवर निशाणा साधत ‘मोदी भावूक होणे हा तर ठरवून केलेला कार्यक्रम असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अटक झालेल्या जावयाची सुटका होत नसल्याने नवाब मलिक अशी बडबड करत आहेत, असे टीकास्त्र भातखळकरांनी सोडले आहे.
ड्रग्जच्या आरोपाखाली अटक झालेल्या जावयाची सुटका होत नसल्यामुळे @nawabmalikncp यांचं डोकं फिरलय, त्या फ्रस्ट्रेशनमधून त्यांची बेताल बडबड सुरू आहे. त्यांनी तोंड वेळीच बंद कराव, नाही तर कळेल अशा भाषेत उत्तर देऊ. pic.twitter.com/FXOPT2oJV5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 23, 2021
ड्रग्जच्या आरोपाखाली अटक झालेल्या जावयाची सुटका होत नसल्यामुळे नवाब मलिक यांचं डोकं फिरलय, त्या फ्रस्ट्रेशनमधून त्यांची बेताल बडबड सुरू आहे. त्यांनी तोंड वेळीच बंद कराव, नाही तर कळेल अशा भाषेत उत्तर देऊ, असा इशाराच अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, नवाब मलिक यांच्या जावयाला सोडवण्यासाठी कोणीही मदत करत नसल्याने असे बेताल वक्तव्य करत आहे. नवाब मलिक यांचे घराचं उकिरडं झालं आहे. त्याच्याकडे जरा लक्ष द्या, राज्यकारभारकडे लक्ष्य द्या. तुमच्या जमिनीवर गुरांजे बाजार चालू आहेत, त्याकडे लक्ष द्यावे. देशाच्या पंतप्रधानांबाबत बोलण्याची नवाब मलिक यांची लायकी नाहीये, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
Read Also :
- ‘पंतप्रधान मोदी भावूक झाले हा तर ठरवून केलेला कार्यक्रम’
- ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मंद गतीचे झालेत’
- शेतकऱ्यांची देशव्यापी आंदोलनाची हाक; काँग्रेस, राष्ट्रवादीसह 12 पक्षांचा पाठिंबा
- ‘बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली’
- ‘राज्याच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी’