मुंबई : कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत उपाययोजनांचा आढवा घेत असतात. अशाच एका कार्यक्रमात डॉक्टरांशी चर्चा करताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा देखील साधला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मोदी भावूक होणे हा तर ठरवून केलेला कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे.
कोरोनाने देशात लाखो लोकांनी जीव गमावले. यामुळे मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण होत आहे. अशातच व्हिसी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पण ते खरंच भावूक झाले की हे चित्र निर्माण करण्यात आले, याबाबत आता लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे मलिक म्हणाले.
कोरोनाने देशात लाखो लोकांनी जीव गमावले. यामुळे मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण होत आहे. अशातच व्हिसी दरम्यान पंतप्रधान @narendramodi भावूक झाले. पण ते खरंच भावूक झाले की हे चित्र निर्माण करण्यात आले, याबाबत आता लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.- ना. @nawabmalikncp pic.twitter.com/a1BU6rAJ4y
— NCP (@NCPspeaks) May 23, 2021
मोदी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिसीद्वारे चर्चा करताना नेहमीच उपरणे व मास्क वापरतात. मात्र त्यादिवशी त्यांनी उपरणे व मास्क दोन्ही वापरले नाही याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा आरोप देखील मलिक यांनी पंतप्रधानांवर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून झाले याचं उत्तर आणि खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील? मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले हे जे चित्र निर्माण करण्यात आले. ते भावूक झाले याबाबत लोकं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत, असेही ते म्हणाले.
Read Also :
- ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मंद गतीचे झालेत’
- शेतकऱ्यांची देशव्यापी आंदोलनाची हाक; काँग्रेस, राष्ट्रवादीसह 12 पक्षांचा पाठिंबा
- ‘बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली’
- ‘राज्याच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी’
- ‘कोकणात वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाहीत’