मुंबई : कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली, अशा शब्दात भाजप नेते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी कोकण दौरा केला होता. या एकदिवसीय दौऱ्यावरून भाजप नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. आता बाळासाहेबांच्या सुपुत्राने कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे म्हणत उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली आहे.
कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा…२
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 23, 2021
आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते? ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं, त्या शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडून दिले. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या कोकणाच्या कोकणवासीयांची निराशा ठाकरे सरकारने केली, असे उपाध्ये म्हणाले.
गेल्या वर्षी निसर्ग वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्पेटवर उभे राहून दुरूनच पाहणीचे नाटक केले होते. त्या वेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही, आणि मुख्यमंत्र्यांना याचा पत्ताच नाही. आता मुख्यमंत्री आताच्या संकटाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याची खोटी आश्वासने देत आहेत. गेल्या वर्षी भरडलेल्या कोकणची पुन्हा नवी थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोकणी जनताच प्रश्न विचारेल, हे नक्की, असे ते म्हणाले.
Read Also :
- ‘राज्याच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी’
- ‘कोकणात वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाहीत’
- ‘मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी झाली’
- ‘गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला’
- ‘महाविकास आघाडीच्या नावानेच महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासून ब्लॅक फंगसची लागण’