मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील विरोधक हे ब्लॅक फंगस आहेत, अस टीका केली होती. त्यांच्य या टीकेला आता भाजप नेते प्रसाद लाड यांन जोरदार टीका करत महाविकास आघाडीच्या नावानेच महाराष्ट्राला ब्लॅक फंकसची लागण झाली असल्याचे म्हटले आहे.
पुण्यातील कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी बोलताना कोरोना उद्रेकाळाच्या काळात मुंबईत चांगलं काम झालं आहे. या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. तरी देखील विरोधक टीका करत आहेत. या टीकेकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रित करावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या दीड वर्षात महाराष्ट्राला लागलेली काळी बुरशी कोण हे तुम्हीच पहा संजय राऊत..!@BJP4Maharashtra @bjp4mumbai pic.twitter.com/Oj4FcINADv
— Prasad Lad (@PrasadLadInd) May 22, 2021
महाविकास आघाडीच्या नावाने महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासूनच ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. बोलताना जरा भान ठेवून बोला. ज्याचे तुम्ही कौतुक करत आहात त्याच मुंबई महापालिकेत 2 हजार 200 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम शिवसेना करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोना काळात हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, अशी जोरदार टीका प्रसाद लाड यांनी केली.
दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील राऊतांच्य टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना असून पक्ष तीन असले तरी यात कितीतरी विविध प्रकारचे ‘म्युटंट’ आहेत, अशी सणसणीत टीका त्यांनी केली.
Read Also :
- ‘…म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून आणि दडी मरून घरी बसलेले असतात का?’
- पुणे महापालिका लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- पीक विम्याच्या प्रश्नी उच्च न्यायालयात जाणार – राणाजगजितसिंह पाटील
- ‘राज्यपालांनी ठराविक दिवसांत आमदारांची नियुक्ती करावी, असं काही बंधन नाही’
- ‘हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना’