मुंबई : ठाकरे सरकारने नोव्हेंबर महिन्यात विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या शिफारसीची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र अद्याप राज्यपालांकडून या नियुक्त्यांना मंजूरी दिलेली नाही. याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्यपालांनी याबाबत अद्याप निर्णय का घेतला नाही?, असा सवाल करत स्पष्टीकरण मागितले आहे. आता यावर भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यपालांनी विधान परिषदेच्या आमदार नियुक्तीबाबत इतक्याच कालावधीत निर्णय घ्यावा, असा कोणताही कायदा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
न्यायालायने विचारलेल्या प्रश्नावर बोलणे टाळत आशिष शेलार म्हणाले की, यालयीन लढाईत अधिक बोलणं योग्य नाही. मात्र, मी जो काही कायद्याचा अभ्यास केला आहे. त्यानुसार अमूक दिवसात राज्यापालांनी निर्णय घ्यावा, असं काही बंधन त्यांच्यावर टाकण्यात आलेलं नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाच्या भूमिकेबाबत मी काही बोलू शकत नाही. मात्र, काही लोक राज्यपालांवर बोलत आहेत, हे चुकीचे आहे, असेही शेलार म्हणाले. दरम्यान, 12 आमदारांच्या नियुक्तीप्रश्नी रतन सोली यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या नियुक्त्या अद्याप का झाले नाही ? याबाबतचे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. याप्रकरणी 9 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.
Read Also :
- ‘हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना’
- शरद पवारांचे उदाहरण देत चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले…
- ‘राज्यातले विरोधक हे ‘ब्लॅक फंगस’, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा’
- एकाच दगडात दोन पक्षी मारणारे मलिक; आपल्याच सरकारला बदनाम करून घरचा आहेर देत आहेत
- अजितदादांनी आता स्वतःच कोकण दौरा करून, “दादा”स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत