पुणे : तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौकण दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या एकदिवसीय दौऱ्यावर भाजपकडून सडकून टीका होत आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे उदाहरण देत मुख्यमंत्र्यांना सल्ला दिली.
लातूर भूकंपावेळी शरद पवारांनी केलेल्या कामाची आठवण करून देत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, दोन दिवसांत पंचनामे करून मदत जाहीर करू. पण, दोन दिवसांत पंचनामे होण्यासाठी त्यांनी ३ दिवस तिकडे जायला हवं होतं. उद्धवजींशी माझं काही वाकडं नाही. ते काही माझे दुश्मन नाहीत. पण प्रशासन हे काठी घेऊन बसल्याशिवाय ताळ्यावर येत नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
शरद पवार राजकीयदृष्ट्या आमचे कितीही विरोधक असोत. पण लातूरच्या भूकंपामध्ये शरद पवार लातूरमध्ये तंबू ठोकून राहिले. त्यामुळे तिथली परिस्थिती नियंत्रणात आली. एवढ्या मोठ्या संकटात ८ दिवस राहणं कठीण आहे. आता वादळ आल्यानंतर तिथली हवा बरी आहे. तुम्हाला प्रकृतीच्या समस्या आहेत तर तंबूत नका राहू. पण प्रशासनात भिती निर्माण व्हायला हवी, असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता तातडीने कोकणात जावं आणि त्यांच्या स्टाईलने ८ दिवस मुक्काम करून सगळे पंचनामे करून घ्यावेत, असेही यावेळी पाटील म्हणाले.
Read Also :
- ‘राज्यातले विरोधक हे ‘ब्लॅक फंगस’, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा’
- एकाच दगडात दोन पक्षी मारणारे मलिक; आपल्याच सरकारला बदनाम करून घरचा आहेर देत आहेत
- अजितदादांनी आता स्वतःच कोकण दौरा करून, “दादा”स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत
- मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा लिपस्टिक नव्हे; नुसता “पावडर दौरा” होता
- भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडेंना, आयटी ॲक्ट ६७ अंतर्गत पोलिसांनी घेतलं ताब्यात