पुणे : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअप सारख्या समाज माध्यमांतून, अश्लील आणि बदनामीकारक शब्द वापरून, अवमान करणाऱ्यांविरोधात काही दिवसांपूर्वी सायबर सेलकडे गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, यासंदर्भात आज बांद्रा सायबर सेल पोलिसांनी, भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांना सकाळी पुण्यातून ताब्यात घेतलं असून, आता त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम २९५ (अ), ५०० आणि ५०५/२ कलमांतर्गत, आणि आयटी एक्ट ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. दुसरीकडे यावर भाजपकडून, गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, “माझी अटक एक राजकीय षडयंत्राचा भाग असून, यात काही मोठ्या लोकांचा सहभाग आहे. मला ४२१ ची नोटीस पोलिसांनी द्यायला हवी होती. पवार कुटुंबीय एवढंच जर घाबरत असेल, तर गोविंद बागेत त्यांनी गोट्या खेळाव्यात,” अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
दुसरीकडे गावडे यांनी, शुक्रवारी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर, “मी ८ ते १० दिवसांपूर्वी एकूण ५४ जणांवर गुन्हा दाखल केला होता. यातील बऱ्याच जणांनी महिलांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह असं वक्तव्य केलेलं आहे, काहींनी तर महिलांना बलात्काराच्या धमक्याही दिलेल्या आहेत. कुणाला पुरावे हवे असतील त्यांनी मला येऊन भेटावे मी सर्व पुरावे तुम्हाला देईन”, असा आरोप त्यात गावडेंनी केला आहे.
तसेच, या व्हिडिओमधून त्यांनी असं देखील सांगितलं आहे, ‘ज्यादिवशी माझ्यावर गुन्हा दाखल झाला, त्याचदिवशी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांकडे माझी तक्रार केली. तसेच, पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी संबंधित ट्विट डिलिट केलं. माझ्याविरोधात अनेक ठिकणी तक्रारी आणि गुन्हे दाखल केले गेले आहेत. मात्र, माझे ट्विटस आक्षेपार्ह नाहीत.’
Read Also :
- राष्ट्रवादी आणि भाजपचे शहराध्यक्षांमध्ये खडाजंगी; राज्य शासनाच्या मदतीवरून धरले धारेवर
- कोरोना संकटात आरबीआयचे पैसे लसीकरणासाठी वापरा – रोहित पवार
- ‘ठाकरे सरकार वादळग्रस्तांसाठी खंबीरपणे उभे, पण फडणवीसांनी केंद्राकडून राज्याला मदत मिळवून दिली पाहिजे’
- आपच्या खासदाराची भविष्यवाणी ठरली खरी, मोदीजी कॅमेऱ्यासमोर आले अन् एकदम…
- देशात लसींच्या तुटवड्याला केंद्र सरकार जबाबदार- सिरम इन्स्टिट्यूट